अहमदनगर : 'आज जे कृषी विधेयक आले आहे त्याचा ड्राफ्ट हा शरद पवार हे कृषिमंत्री असतानाच तयार झाला होता. शरद पवारांचा आत्मा शेती म्हणतात, मला ते माहित नाही. पण शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्याची चर्चा राज्यसभेत सुरू असताना पवार साहेब गैरहजर का राहिले ?' असा प्रश्न कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला. नगरमध्ये पाशा पटेल आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर टीका केली.'कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडला तर कुठेच भारतात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही,' असे सांगतानाच पटेल म्हणाले, 'जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात. पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत, उलट शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केवळ पंजाब, हरियाणा सोडला तर भारतात कुठेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही. दिल्लीत ज्या आंदोलनाची सुरुवात झाली ती केवळ एमएसपी चा कायदा करा, या एकाच गोष्टीसाठी झाली होती. सरकार त्या विषयावर जेव्हा चर्चा करण्यास तयार झाल्यावर, हेच आंदोलक म्हणतात तिन्ही कृषी विधेयक रद्द करा. एक मागणी मान्य करण्याऐवजी कृषी विधेयक रद्द करा, असे म्हणणे म्हणजेच आंदोलनात राजकारण सुरू झाले आहे'.असा आरोपही त्यांनी केला. |
टिप्पणी पोस्ट करा