विक्रम बनकर, अहिल्यानगर : मान्सून पूर्वी पावसाने मंगळवारी महाराष्ट्राला झोडपले. पुणे, मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पावसाने दाणादाण उडवली. आज, बुधवारी (२१ मे २०२५) रोजीही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
('मराठी PRINT' चा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा )
राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवमान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहिल्यानगरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
('मराठी PRINT' चा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा )
या जिल्ह्यांना देण्यात आलाय यलो अलर्ट
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा
टिप्पणी पोस्ट करा