ब्युरो टीम : अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय-१७१ उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं. अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व प्रवाशांच्या नातेवाईकांना एअर इंडियाकडून सहकार्य केलं जात आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करत आहे. तसेच या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरील प्रोफाइल फोटो हटवला आहे.
✈️ A new era of comfort and pampering awaits! Presenting 3,600 sq km of Nirvana at 38,000 ft. #AirIndia #onboardexperience #FlyingReturns #MumbaiLux
— Air India (Official) (@airindia) May 29, 2025
दुसरीकडे, अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा