ब्युरो टीम: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव (ता. कागल) येथे आज कृषी विभागामार्फत 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या 'महाबीज' बियाण्यांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बीजप्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “उत्पन्नवाढ आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी बीजप्रक्रिया अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.”
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
ही योजना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असून, गुणवत्तापूर्ण व शाश्वत उत्पादन क्षमता असलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना या बियाण्याचा मोठा फायदा होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा