ब्युरो टीम : सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी अडीच- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले होते. त्यादृष्टीने आता सरकारनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने आता बहुप्रतिक्षित मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील 9 प्रमुख महापालिकांमधील प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
सरकारनं मंगळवारी (ता.10) महापालिका,नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या महापालिका अ, ब आणि क वर्गातील आहेत.सरकारनं प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिलेल्या महापालिकांमध्ये मुंबई,ठाणे,नवी मुंबई,वसई विरार,पुणे,पिंपरी चिंचवड,छत्रपती संभाजीनगर, नागपूर,नाशिक आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकांच्या लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पहा व्हिडिओ : पिंपरी चिंचवड महापालिकेचे हरित कर्ज रोख्यांच्या लिस्टिंग
टिप्पणी पोस्ट करा