शिवनेरीपासून विश्रमागडापर्यंतचा प्रवास
खा. लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० मार्च रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती. १६ मार्च रोजी किल्ले शिवनेरीवरून मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड आदी दुर्गांवर मोहिम राबवून शिवप्रेमींना एकत्र आणण्यात आले. प्रत्येक महिन्यात एका गडावर होणाऱ्या या उपक्रमाचा सातवा टप्पा आता विश्रामगडावर होणार आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोहीमेत राज्यभरातून शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून ही चळवळ दुर्गसंवर्धनाचा एक नवा आदर्श ठरत आहे.
सहभागाचे आवाहन
गेल्या काही मोहिमांप्रमाणेच या मोहिमेतही राज्यभरातील शिवभक्त, स्थानिक नागरिक,तरूणाई यांचा मोठया प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. या माध्यमातून स्वच्छता, संवर्धन आणि शिवस्मृतींचे जतन करण्याचा संदेश समाजात रूजविण्याचा खा. नीलेश लंके यांचा संकल्प आहे.
टिप्पणी पोस्ट करा