शुक्रवारी सकाळी कायनेटिक चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. चौकालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांसमोरील पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. त्यानंतर सक्कर चौकापासून महावीर कलादालन, मार्केटयार्ड चौकापर्यंत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तेथील रस्त्यावरील हातगाड्या हटवण्यात आल्या. लालटाकी अप्पू चौकातील दुकानदारांनी रस्त्यावर साहित्य टाकून अतिक्रमण केले होते. तेही पथकाने कारवाई करून जप्त केले.
शहरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. अतिक्रमणे स्वतःहून काढून न घेतल्यास महानगरपालिका जेसीबीच्या सहाय्याने ती हटवेल. यात नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा