ब्युरो टीम : भारतीय संघाने टी-20 विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नामिबियाचा पराभव केला आहे. हा सामना 93 धावांच्या मोठ्या फरकाने भारताने जिंकला आहे.
T20 World Cup. India Won by 93 Run(s) https://t.co/SQLoaZjq98 #TeamIndia #INDvNAM #T20WorldCup
— BCCI (@BCCI) February 12, 2026
टी-20 विश्वचषकात भारताचा धावांनी हा सर्वात मोठा विजय आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 बाद 209 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नामिबियाने चांगली सुरुवात केली, परंतु फिरकी गोलंदाजी पुढे त्यांचा डाव कोसळला. 19 व्या षटकात त्यांचा संघ 116 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने गट अ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

टिप्पणी पोस्ट करा