ब्युरो टीम : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भारताच्या तीनही सेना दलांनी तयारीही पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारी (7 मे) मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
वाचा : तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..!, वाचा नेमका प्रकार काय?
ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे.
वाचा : 'या' जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, खालील गोष्टींवर सराव केला जाणार
- हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे.
- नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे.
- हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे).
- महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया.
- हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव.
टिप्पणी पोस्ट करा