जिल्ह्यातील प्रमुख धरणांची साठवण क्षमता आणि उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे – कोयना 95.58 (105.25), धोम 13.14 (13.50), कन्हेर 9.80 (10.10), धोम बलकवडी 4.03 (4.08), उरमोडी 9.75 (9.97), तारळी 5.45 (5.85), वारणा 31.58 (34.40), राधानगरी 8.36 (8.36), दूधगंगा 22.61 (25.40), तुळशी 3.39 (3.47), कासारी 2.42 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), तर अलमट्टी 117.88 (123).
सध्या विविध धरणांतून सुरू असलेला विसर्गही मोठ्या प्रमाणात आहे. कोयना 12,100, धोम 3,563, कन्हेर 740, धोम बलकवडी 3,064, उरमोडी 450, राधानगरी 11,500, दुधगंगा 1,600, तुळशी 500, कासारी 500, पाटगाव 406, हिप्परगी बॅरेज 70,306 आणि अलमट्टी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाच्या पुलांवरील पाण्याची पातळी आज पुढीलप्रमाणे नोंदली गेली – आयर्विन पूल सांगली येथे 14.9 फूट (इशारा पातळी 40 फूट) व अंकली पूल हरिपूर येथे 13.9 फूट (इशारा पातळी 45.11 फूट).
जिल्ह्यात मागील 24 तासांत सरासरी 8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात 24.5 मिमी झाला. इतर तालुक्यातील पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे – मिरज 11 (272.9), जत 6.4 (260.2), खानापूर-विटा 1.6 (220.5), वाळवा-इस्लामपूर 10.2 (394.6), तासगाव 3.6 (277.6), शिराळा 24.5 (944.7), आटपाडी 2.2 (251.4), कवठेमहांकाळ 4.1 (257.7), पलूस 7 (347.3), कडेगाव 3.5 (271.5).
या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा समाधानकारक असून, नदीपात्रांमधील पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा