ब्युरो टीम : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘पंचायत’ (Panchayat) ही लोकप्रिय वेब सीरिज लवकरच आपल्या चौथ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०२० साली या सीरिजने आपल्या पहिल्या सीझनने धमाकेदार सुरुवात केली होती. साध्या गावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली. त्यानंतर २०२२ साली प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या सीझननेही तितकीच लोकप्रियता मिळवली.
आता, ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली असून, ती ‘प्राइम व्हिडीओ’वर २ जुलैपासून स्ट्रीम होणार आहे. सोशल मीडियावर प्रमोशनल व्हिडिओद्वारे या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
प्रधानजींवर हल्ला कोणी केला?
‘पंचायत ३’ च्या शेवटी प्रधानजींवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चौथ्या सीझनविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सीझनमध्ये सचिवजी आणि रिंकीचं लग्न होईल का?, प्रधानजींवर झालेल्या हल्ल्यामागे कोण आहे?, विकास आणि प्रल्हादचे पुढचे पाऊल काय असेल?, अशा प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
हे आहेत कलाकार
या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका आणि पंकज झा हे कलाकार पुन्हा एकदा आपली भूमिका साकारताना दिसतील. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी या सीझनचं दिग्दर्शन केलं आहे. आता, २ जुलैपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर पंचायत ४ कसा धमाका करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय
टिप्पणी पोस्ट करा