Special : वीज पडतेय... काय कराल?

ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. याकाळात वीज पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. वादळीवारा आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व विजेपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विजा चमकत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यांचा आढावा...

घरात असताना...

  • -वातावरणातील बदल पाहून वादळाचा किंवा अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज असेल, तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा
  • - घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा
  • - घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलित यंत्र बंद ठेवा
  • - विजेवर चालणाऱ्या वस्तू बंद ठेवा
  • - घराचे दरवाजे, खिडक्या, कुंपण यापासून दूर राहा

घराबाहेर असताना...

  • -त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) जा
  • -ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यापासून दूर राहा
  • - गाडी चालवत असल्यास सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करा
  • - मोठ्या झाडापासून गाडी लांब पार्क करा
  • - जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा
  • - मोकळ्या, तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहा
  • - जंगलात असल्यास दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्या
  • - मोकळ्या जागेवर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावेत व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे

हे लक्षात ठेवा

  • -मोबाइल, वायरद्वारे जोडले गेलेले फोन व इतर इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नयेत
  • - वादळ सुरू असताना व विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका
  • - धातूची दारे, लोखंडी खिडक्या, वायरिंग, लोखंडी नळ यांच्याशी संपर्क टाळावा

घराबाहेर असताना असे राहा सतर्क

  • -मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना, वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका
  • -वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा
  • - अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून लांब राहा

वीज पडल्यास हे कराः

  • - त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा.
  • - वज्रघात बाधित व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्या.
  • - ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा, जेणेकरून हायपोरमीयाचा (शरीराचे अती कमी तापमान) धोका कमी होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने