मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या तीन दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे, घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण होणे तसेच काही ठिकाणी किरकोळ संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक असल्यास हवामानाचा अंदाज व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची माहिती घेऊनच प्रवास करावा.
विशेषतः सखल भागात राहणारे नागरिक, घाट परिसरातून प्रवास करणारे वाहनचालक तसेच समुद्रकिनारी जाणारे पर्यटक यांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक :

टिप्पणी पोस्ट करा